पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी एका आदिवासी नागरिकाची गळा आवळून हत्या केली.
★ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
एस.के.24 तास
अहेरी : पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी एका आदिवासी नागरिकाची गळा आवळून हत्या केली.अशोक तलांडी रा.दामरंचा असे मृत व्यक्तीचे नाव असून आज,शुक्रवारी सकाळी भामरागड - आलापल्ली मार्गावरील ताडगाव जवळ त्याचा मृतदेह आढळून आला.