" जलजीवन " ची कामे अपूर्ण तब्बल ३२ कंत्राटदारांना जिल्हा परिषदेने नोटीस बजावली आहे.
एस.के.24 तास
चंद्रपूर : जलजीवन मिशनची मुदत मार्च महिन्यातच संपुष्टात आली.काही कामांचा वेग फारसा वाढला नाही.काम पूर्ण करून देण्याबाबत या कंत्राटदारांना वारंवार सूचना देण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही कामचुकार कंत्राटदारांनी फारसे मनावर घेतलेले नाही.परिणामी जिल्हा परिषदेने ३२ कंत्राटदारांना नोटीस बजावली आहे. मुदतीत कामे न केल्यास या कामचुकार कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याआधी कामचुकार कंत्राटदारांना काळ्यायादीत टाकले होते.