अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव व इथून निवडणूक लढणे हा माझा हक्क आहे.हा हक्क डावलण्यात आला. - ब्रिजभूषण पाझारे
एस.के.24 तास
चंद्रपूर : ही बंडखोरी नाही तर हा उठाव आहे.सलग पंधरा वर्षे मतदारसंघात काम केले, निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची पूर्ण तयारी केली आणि शेवटच्या काही तासांमध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,महा आघाडी व महायुती असे सर्व पक्ष फिरून आलेल्याला उमेदवारी दिली गेली.हा खऱ्या अर्थाने अन्याय आहे.
अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे व इथून निवडणूक लढणे हा माझा हक्क आहे.मात्र, हा हक्क डावलण्यात आला,अशी प्रतिक्रिया भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार ब्रिजभूषण पाझारे यांनी व्यक्त केली.