शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या गयाबाई पाल यांचा सरपंच नंदकिशोर वाढई यांनी केला सत्कार.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : राजुरा तालुक्यातील ग्रामपंचायत कळमना येथील आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी ग्रामपंचायत कळमना अंतर्गत निंबाळा येथील गयाबाई हरी पाल यांनी आपल्या वयाची १०० वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करून सुदृढ दिर्घ आयुष्याच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
जिल्हा स्मार्ट ग्राम कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई हे नेहमीच लोकोपयोगी आणि सामाजिक दृष्ट्या उपयुक्त उपक्रम राबविण्यासाठी हिरिरीने पुढाकार घेत असतात हे विशेष. ग्रामपंचायत अंतर्गत जेष्ठ महिलेने नाबाद शतक पूर्ण केल्याचा आनंद त्यांनी एका वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
या प्रसंगी यांचा मुलगा विठ्ठल पाल, ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे, महादेव ताजणे अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ, महादेव मेश्राम जेष्ठ नागरिक निबाळा, पोलीस पाटील गोपाल पाल, पाल पाटील, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते सुरेश गौरकार, दत्ताजी पिंपळशेंडे, वसंता सपाट, सुरेश मुठलकर, निलकंठ मोडघरे, प्रभाकर पाल यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.