पर्यावरण पूरक लेखनासाठी डॉ.धनराज खानोरकरांना " पर्यावरण मित्र " पुरस्कार.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२२/०६/२५ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख,पत्रकार,प्रसिद्ध लेखक व कवी डॉ.धनराज खानोरकर यांना पर्यावरण संवर्धन व विकास समिती, चंद्रपूर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाव्दारे उर्जानगरातील कामगार मनोरंजन भवनात नुकत्याच पार पडलेल्या पर्यावरण संमेलनात मान्यवरांच्या हस्ते " पर्यावरण मित्र " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते, दलितमित्र डी.के.आरीकर, हिराचंद बोरकुटे,डॉ.बळवंत भोयर,हरिस ससनकर,डॉ.देव कन्नाके,वैशाली रोहणकर इत्यादी उपस्थित होते.
साहित्य प्रकार कवितां व ललित लेखनातून, पत्रकारितेतून डॉ.धनराज खानोरकरांनी पर्यावरण पूरक लेखन करुन जनजागृती करण्याचे कार्य केले.त्यांचे विशेषतः ' मास्तर मातीचे ' व 'ओल्या वेलीची विलांटी ' या कवितासंग्रहात पर्यावरणावर व शेतीमातीवर अनेक कवितां आहेत.याशिवाय ललितबंध 'संजोरी'तही पर्यावरण पूरक लेखन आहे.
त्यांचे सहा कवितासंग्रह आणि ललित बंध 'संजोरी' ग्रंथ व संपादित पुस्तके प्रसिद्ध आहेत.या निमित्ताने त्यांना 'पर्यावरण मित्र 'पुरस्काराने सन्मानित केले गेले.या सन्मानाबद्दल ने. भै.हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया,कार्य. प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, समस्त प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी,पत्रकार मित्र,मित्र मंडळाने त्यांचे जाहीर अभिनंदन केले आहे.