काँग्रेस च्या प्रचारात RPI चा निळा झेंडा गायब होणार की काय ?

काँग्रेस च्या प्रचारात RPI चा निळा झेंडा गायब होणार की काय ? 


 मुनिश्वर बोरकर - गडचिरोली


गडचिरोली : इंडिआ आघाडी सोबत रिपब्लिकन पार्टी च्या प्रमुख चार गटापैकी एकही गट संध्या तरी सोबत नसल्यामुळे रिपब्लिकन पार्टी चा निळा झेंडा काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात दिसणार नसल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

रिपब्लिकन पार्टीच्या प्रमुख चार गटापैकी खासदार रामदास आठवले यांचा रिपब्लिकन (ए) गट गेल्या १० वर्षापासुन भाजपा सोबत असल्यामुळे भाजपा उमेदवार डौलाने त्यांचा निळा झेंडा गाडीला लावताना दिसतात. वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना दोन टर्म झाले आघाडीत घेतो म्हणुन कांग्रेस वंचितला हुलकावणी देत असल्यामुळे वंचित स्वतंत्रपणे लढत आहे.


वंचितचा निळा झेंडा सुद्धा काँग्रेस पासुन दुर गेलेला आहे. पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्र कवाडे चा रिपाई पक्ष मागील दहा वर्ष काँग्रेस सोबत होता परंतु काँग्रेसने जोगेंद्र कवाडे यांना विधान परिषदेत हुलकावणी दिल्यामुळे पिरिपा नेते या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेना महायुती सोबत असल्यामुळे काँग्रेस पासुन पिरिपाचा निळा झेंडा दुर गेला. 


चौथा रिपब्लिकन पार्टी चा एक महत्वाचा गट त्याचे प्रमुख राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.राजेंद्र गवई इंडिआ आघाडीत राहु ईच्छित होते परंतु काँग्रेस रिपाईला सुद्धा बाजुला सारल्यामुळे डॉ.राजेंद्र गवाई यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा स्थापित एकमेव मुळ रिपाई पक्ष सुद्धा स्वतंत्रपणे निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्यामुळे रिपाई - गवई गटाचा निळा झेंडा सुद्ध काँग्रेस पासुन दुर गेगेला दिसतो.


म्हणजेच एकदरीत आरपिआय चे चार प्रमुख पक्ष व त्यांचे झेंडे कांग्रेस पासुन दुर जावून आहेत.देशातील तिसऱ्या नंबरचा प्रमुख पक्ष बसपा ला सुद्धा इंडिआ आघाडीत सामावून न घेतल्यामुळे बसपा चा हत्ती (निळा झेंडा ) सुद्धा कांग्रेस पासुन दुर आहे.


अनेकांना वाटतो की आरपीआय मधे १७ गट आहेत. वरील चार प्रमुख गटाला सोडले तर इतर १३ गट " ना तळ्यात ना मळ्यात " आहेत.त्यांना ना काँग्रेस ना भाजपा विचारत विचारात घेत नाहीत.असे अखील भारतीय , खोखो सारखे पक्ष आमचा मोठा पक्ष आहे आमचा काँग्रेस ला पाठींबा आहे.असे जाहीर करतांना दिसतात,ना घर का घाटका प्रमाणे रिपाईच्या १३  गटाला पाहिजे तेवढे काँग्रेस वाले विचारात घेत  नाही. 


त्यामुळे अश्या पक्षाला काँग्रेसवाले, घे शिरणी राय गुपचुप करीत आहेत.भाजपा - शिवसेना पक्षांना हारवायचे असेल व इंडिआ आघाडीला मजबुत करावयाचे असेल तर महाराष्ट्रात काँग्रेसला रिपाई चा निळा झेंडाच मजबुत ठरु शकतो.परंतु काँग्रेसवाले रिपाइं ला महत्व देत नसल्यामुळे महाराष्ट्रात कांग्रेसचे स्वप्न भंग पावण्याची दाट शक्यता आहे.


आरपीआय चे मोठे दोन पक्ष भाजपा सोबत गेलेत परंतु त्याचे कार्यकर्ते स्थानिक नेते आम्ही काँग्रेस सोबत आहोत म्हणतात तरीही काँग्रेसवाले त्यांना विचारात घेतांना दिसत नाही.उमेदवार आपल्याच तोऱ्यात वावरतांना दिसतात.म्हणुनच वंचित सारखा मोठा पक्ष काँग्रेस ला घातक ठरणार आहे हा येणारा काळच सांगेल.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !