अपंग निराधारांना अन्न पुरवठा व विविध शासकिय योजना घरपोच देण्यात यावा यासाठी आमदार डॉ.मिलींद नरोटे यांना निवेदन.
एस.के.24 तास
गडचिरोली : देशात मोठ्या प्रमाणात अपंग,निराधार व निराश्रीत लोक आहेत.ते दुसऱ्यांच्या सहकार्याशिवाय जगू शकत नाही.अशा लोकांना शासनामार्फत धान्य पुरवठा,संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना , वृद्धापकाळ निवृती वेतन अशा विविध योजना मिळतात.अन्नधान्य मिळविण्यासाठी हे लोक धान्य दुकानापर्यंत जाऊ शकत नाही.
अन्नधान्य लाभार्थ्यांना त्यांच्या घरपोच मिळावे अशी योजना शासनाने करावे.तसेच विविध योजनांद्वारे मिळणारा पैसा त्यांच्या बॅक खात्यात जमा होण्यापेक्षा त्यांच्या घरी प्रत्यक्ष हातात मिळावे अशी योजना निर्माण करावे.
अपंग व निराधार लाभार्थी घरा बाहेर जाऊ शकत नसल्याने अन्नधान्य व पैसा मध्यस्थी किंवा दलाली देऊन उचल करतात.त्याचा मोबदला त्यांना द्यावा लागतो.तसेच जास्त काळ पैसा बॅकेतून उचल न झाल्यास बॅक तो पैसा गोठवून टाकते.त्यामुळे अपंग व निराधारांची उपासमार होते.यांवर शासनाने योग्य योजना निर्माण करावे .
निवेदन देतेवेळी भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष ,प्रमोद राऊत प्रभारी राष्ट्रीय किसान मोर्चा,तुळशिराम सहारे माजी नगरसेवक,दामोधर शेंडे बहुजन मुक्ती पार्टी,जयंत गेडाम,उमेश ढोक,मिना मेश्राम उपस्थित होते.