धनगर आरक्षण ला मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा ; म्हणाले “ आपल्या दोघांचं दुःख ”
एस.के.24 तास
नागपूर : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना धनगर समाजानेही आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशीच त्यांनी धनगर समाजालाही पेटून उठण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, धनगर आरक्षणासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिलं. चौंडी येथे आयोजित केलेल्या धनगर मेळावा कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील बोलत होते.