आलेवाही,जीवनापूर,वाढोणा,परिसरात बिबट गावकऱ्यांचा पाळीव जनावरांच्या गोठ्यातून शेळ्या, कोंबड्या घेऊन जात असल्याने गावकरी दहशतीत.
एस.के.24 तास
सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यातील जंगला लगतच्या गावामध्ये आतापर्यंत वाघाच्या “ त्या ” सवयीने गावकरी त्रस्त होते. आता बिबट्याला देखील तीच सवय लागल्याने गावकरी मात्र दहशतीत आले आहेत.
जिल्ह्यातील तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रांतर्गत आलेवाही, जीवनापूर,वाढोणा, कन्हाळगाव, गोविंदपुर, येनोली, सोनुली,गिरगाव, सावंगी, ओवाळा,या भागामध्ये वाघ,बिबट यांच्या हल्ल्यामध्ये सतत पाळीव जनावरे ठार होण्याच्या घटना ह्या नित्याच्याच झाल्या आहेत. आता मात्र काही दिवसापासून जीवनापूर,वाढोणा, सावंगी,कन्हाळगाव या गावामध्ये रात्रीला बिबट्याचे जाणेयेणे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.