सावली तालुक्यात रानटी हत्तींचा शिरकाव.विहीरगाव शेत शिवारात काढुण ठेवलेला मक्का एका रात्रीतुन केला फस्त.
📍धान पिके तुडविली शेतकऱ्यांवर तिहेरी संकट.
एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यात पुन्हा एकदा रानटी हत्तींनी शिरकाव केल्याने मक्का व धान उत्पादक शेतकऱ्यांना तिहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.मागील 2 ते 3 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा कळप मोठ्या प्रमाणात उपद्रव माजवत असुन या हत्तींना प्रतीबंध करण्यासाठी वनविभाग हतबल झालेला आहे.
मागील 2 वर्षांपासून चंद्रपूर वन विभागाच्या सावली वनपरिक्षेत्रातील वैनगंगा नदी काठावरील गावांना सुध्दा आपले लक्ष्य केले आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठे नुकसान होत आहे. शुक्रवारी रात्रौ 12 ते 1 च्या दरम्यान गडचिरोली वनविभागाच्या पोर्ला वनपरिक्षेत्रामधील काटली साखरा वन क्षेत्रात संचार करीत असलेल्या 30 ते 32 संख्येतील रानटी हत्तींचा कळप वैनगंगा नदी ओलांडुन विहीरगाव शेत शिवराकडे येत असल्याची माहिती साखरा येथील नागरीकांनी विहीरगांवच्या शेतकऱ्यांना दिली.
सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली,सध्या मक्का व धान पिक काढणीला आली आहेत, निसर्गाच्या प्रकोपातुन उरलेल्या पिकांची काढणीची लगबग असल्याने काही शेतकऱ्यांनी मक्का तोंडुन शेतात सुकविण्यासाठी ठेवलेला आहे.तर धान पिके कापण्याच्या प्रतीक्षेत आहे.विहीरगाव येथील शालीक वाकडे,मुखरु वाकडे,यांच्या शेतात काढलेला मक्का हत्तींनी फस्त केला व धान पिकांस तुडविले तसेच
विठ्ठल वाकडे,बेबी वाकडे,रवी वाकडे,हीराजी वाकडे,मधुकर वाकडे,व शकुंतला नथ्थुजी नागोसे यांच्या शेतातील धान पिके तुडवल्याने शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे. मागील पंधरवाड्यात वादळी पाऊस व गारपीटीने पिकांस फटका बसला होता.
दरम्यान याच परिसरात पट्टेदार वाघाचा संचार असल्याने भय भिंत झालेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढवले. पीक काढणीला आल्यावर रानटी हत्तींचा शिरकाव झाल्याने येथील शेतकरी तीहेरी संकटात सापडला आहे.हत्तीच्या प्रवेशाची माहीती मिळाताच सावली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी गावक-यांसह रात्रभर लक्ष ठेवुन होते.तो पर्यंत शालीक वाकडे यांच्या शेतात काढून ठेवलेला मक्का हत्तीच्या कळपाने फस्त केला.