पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती म्हणजे साक्षात स्त्री - शक्तीचा जयघोष करणे होय. - प्रा.अतुलभाऊ देशकर माजी आमदार ब्रह्मपुरी.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती म्हणजे साक्षात स्त्री - शक्तीचा जयघोष करणे होय. - प्रा.अतुलभाऊ देशकर माजी आमदार ब्रह्मपुरी. 


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रम्हपुरी :३१/०५/२५ भारतीय इतिहासात मोठ मोठी युद्ध झाली,अनेक साम्राज्य उभी राहिली आणि कोसळली देखील परंतु या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी,ज्या शक्तीनी आपल्या कार्याने समाज हित,धर्मरक्षण, आणि जनकल्याण या मूल्यांना ज्यांनी सर्वोच्च मान दिला त्या अहिल्याबाई होळकर यांचे नाव अग्रस्थानी आहे.


त्यांच्या जीवनाने सिद्ध केले की, एका स्त्रीचे नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरते मर्यादित नाही तर ते समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचू शकते. अशा धर्मरक्षक, राजमाता,महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचा उत्सव करणे म्हणजेच स्त्रीशक्तीचा जयघोष करणे आहे.अशी गौरवोद्गार भाजपा नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी केले.३१  मे रोजी भारतीय जनता पक्ष कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त अभिवादन करण्यात आले.

 

याप्रसंगी माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर,प्रा.कादर शेख सर,प्रा. प्रकाश बगमारे प्रदेश सचिव भाजपा ओबीसी मोर्चा, श्री.चिडे सर, भाजपा ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष प्रा.डॉ.अशोक सालोटकर, महामंत्री प्रा.दिलीप जुमडे, राजू भागवत,शंकर सातपुते,रश्मीताई पेशने,वर्षा चौधरी,साधना सातपुते,बगमारे, तेलंग साहेब, घनश्याम चौके, मोरेश्वर गरफडे, संजय काकडे,रत्नाताई दंडवते, जामदार ताई व अन्य मान्यवर होते.


यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची यशोगाथा सांगतांना प्रा.प्रकाश बगमारे म्हणाले की,त्या एका महिला शासकाचे उदाहरण आहे,ज्यांनी शक्ती आणि करुणा तसेच  मूल्य आणि कृती यांचा समतोल साधला.अहिल्याबाई होळकर खरोखरच " समाज्ञी संन्याशी " या पदवीच्या पात्र आहेत. एक अशी नेत्या जिने  आपल्या लोकांच्या कल्याणासाठी नि:स्वार्थपणे सत्ता वापरली.अहिल्याबाई होळकर यांनी संपूर्ण भारतातील मंदिरांचा जिर्णोद्धार केला. 


श्री तारकेश्वर,श्री.गंगाजी,अहिल्या,द्वारकेश्वर, गौतमेश्वर यासह ०९ मंदिरांचे काम(पुन्हा)मणिकर्णिका घाट,दशाश्वमेध घाट,जनाना घाट, अहिल्या घाट,शीतला घाट या घाटांचे बांधकाम; उत्तरकाशी धर्मशाळा, रामेश्वर,पंचकौशी धर्मशाळा,कपिला धर्मशाळा इ.बांधकाम करण्याचे महान कार्य अहिल्यादेवी होळकर यांनी केले.संचालन प्रा.डॉ.अशोक सालोटकर,तर उपस्थितांचे आभार राजू भागवत यांनी मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !