पाथरी च्या उपसरपंचाचे अन्नत्याग आंदोलन विविध मागण्यांना घेवून सुरु केले आंदोलन.
एस.के.24त तास
सावली : तालुक्यातील पाथरी येथे अनेक समस्या असुन समस्याबाबत निवेदन देवूनही शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने पाथरीचे उपसरपंच प्रफुल तुम्मे व सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पासकंटीवार यांनी (दि. 10) पासुन शेतकरी, शेतमजुर, दिव्यांग बांधव तथा महिला भगिनीच्या न्यायासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.
सावली तालुक्यात अनेक मोठया समस्या आहेत.याच तालुक्यातील पाथरी येथे इंग्रजकालीन असोलामेंढा तलाव आहे. या तलावाला पर्यटनाचा दर्जा देवून पर्यटन स्थळ घोषीत करावे, पाथरी ते सिंदेवाही रस्यालाची वाताहात झाली असुन या मार्गाने मार्गक्रम करीत असतांना जिव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.तर अनेक किरकोळ अपघात सुध्दा झाले आहेत.
परंतु याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असुन पाथरी सिंदेवाही रस्यासुची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी, पाथरी येथे सचिवालय असुन या ठिकाणी मंजुर असलेल्या नायब तहसिलदाराची नियुक्ती करण्यात यावी, पाथरी येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे शिक्षकांची पदे भरण्यात यावीत, प्राथमिक केंद्राची आरोग्य सेवा कोडमळली असुन रुग्णांना सावलीचे ग्रामिण रुग्णालय किंवा गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करावे लागते, परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण वाहीका नसल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
त्यामुळे पाथरी येथील आरोग्य केंद्रात रुग्ण वाहीका उपलब्ध करुन देण्यात यावी,अतीक्रमणधारकांना त्वरीत पट्टे वितरीत करण्यात यावे, दिव्यांग बांधव,निराधार योजनेचे अनुदान त्वरीत वितरीत करुन दिव्यांग व निराधारांना सहारा देण्यात यावा, असोला मेंढा तलावाचे पाणी नदीला सोडल्याने अनेकांच्या शेतात पाणी साचलेले असुन शेतकऱ्यांना यावर्षीचा हंगाम करणे अडचणीचे जाणार आहे.त्यामुळे तलावाचे पाणी तात्काळ बंद करावे अशा विविध मागण्या घेवून या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपसरपंच प्रफुल तुम्मे व रविंद्र पासकंटीवार यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.
मंगळवार पासुन सुरु झालेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला एकाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याची खंत आंदोलकांनी आमच्या प्रतिनिधीसमोर व्यक्त केली.