धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड अंतर्गत सापळा पीक प्रात्यक्षिक बियाणे वाटप.
एस.के.24 तास : मिथुन कलसार
चंद्रपूर : धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, चंद्रपूर आणि विकासगंगा समाजसेवी संस्था, घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती द्वारे पर्यावरणपूरक शाश्वत शेती हा प्रकल्प पांढरकवडा, वढा,धानोरा,अंतूर्ला,येरुर,सोनेगाव, शेनगाव,मोरवा,ताडाळी, चारगाव, या गावामध्ये प्रकल्प राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन देवेश कुमार (मुख्य महाप्रबंधक धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश -
१) सापळा पिक कीटकांना आकर्षित करून मुख्य पिकाचे संरक्षण करते, ज्यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होतो.
२) कीटकनाशकांचा वापर कमी झाल्याने पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी होतो.
३) सापळा पिकामुळे मित्र कीटकांची (उदा. ढालकिडा, सिरफीड माशी, क्रायसोपा) संख्या वाढते जे कीटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.
४) मुख्य पिकाचे संरक्षण झाल्याने उत्पादन वाढते
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिष नायर (मुख्य व्यवस्थापक,धारीवाल), सूरज तोतडे (सरपंच, पांढरकवडा) तसेच धनंजय दळवी (प्रकल्प समन्वयक), मिथुन कलसार,पूजा चतुर (क्षेत्र प्रवर्तक), कृषी सखी, उपस्थित होते