अहमदाबाद ते लंडन या विमानाला गुरूवारी अपघात झाला ; त्या अपघातात नागपुरातील तीन जण ठार.
एस.के.24 तास
नागपूर : अहमदाबाद विमानतळावर झालेल्या विमान अपघातात विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स ठार झाले.नागपुरातील एका कुटुंबातील तीन जणांचा समावेश आहे.माहितीनुसार शहरातील व्यापारी मनीष कामदार यांची मुलगी, सासू आणि नात यांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात कुशयशा कामदार,रुद्र मोढा और रक्षा मोढा यांचा समावेश आहे. यशा यांचे लग्न अहमदाबाद येथील मोढा कुटुंबात चार वर्षांपूर्वी झाली. हे कुटुंब मूळचे अहमदाबाद आहे.परंतु नंतर ते लंडन येथे स्थायी झाले. ही माहिती मिळताच कामदार कुटुंबीय तातडीने अहमदाबाकडे रवाना झाले अहमदाबाद ते लंडन या विमानाला गुरूवारी अपघात झाला.
सुमारे २४२ प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटात हा अपघात झाला.त्यामुळे हे विमानतळ बंद करण्यात आले आहे. त्याचा फटका नागपूर विमातळारून उडणाऱ्या विमानांना देखील बसला आहे.
अपघातानंतर अहमदाबाद विमानतळावर धुराचे मोठे लोट दिसत आहेत. विमानाने उड्डाण केल्याच्या काही मिनिटांतच ते कोसळले.विमानाने आज दुपारी १.१७ वा. उड्डाण केले होते. विमानतळाकडे जाणारे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके बचाव कार्यासाठी विमानतळावर दाखल झाली.आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आली आहे. कोसळलेल्या विमानात किमान २४२ प्रवासी होते. भारतातील मोठ्या विमान दुर्घटनेपैकी ही घटना आहे.
या घटनंतर विमानतळ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री ९.२५ वाजता नागपूर येथून अहमदाबादला जाणारे विमान रद्द करण्यात आले आहे. तसेच अहमदाबादहून नागपूरला सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी निघणारे विमान देखील रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे नागपूरला येणारे आणि अहमदाबादला नागपूरहून जाणारे प्रवाशांची गैरसोय झाली. नागपूर येथून अहमदाबादसाठी सकाळी ८.३५ वाजता आणि रात्रौ ९.२५ वाजता विमान आहे. तर नागपूरसाठी अहमदाबाद येथून पहाटे ५.५० वाजता आणि सायंकाळी ६.५५ वाजता विमान आहे.
हेही वाचा
भारतातील अपघाताचा इतिहास : -
भारतात १९६२ पासून विमान अपघातांची नोंद आहे. भारतात हवाई अपघातांचे ७ जुलै, १९६२ रोजी आलिटालिया विमानाचे अपघात झाले होते.९४ प्रवासी ठार झाले.त्यावेळी भारतातील सर्वात घातक हवाई अपघात ठरला.
१ जानेवारी, १७८ एयर इंडिया विमान सांताक्रूज विमानतळ, मुंबईवरून उड्डाण घेतल्यानंतर काही काळात अरबी समुद्रात कोसळले.त्यात २१३ लोक ठार झाले.२१ जून, १९८२ इंडियन एयरलाइन्स विमान भोपाळ विमानतळावर उतरवण्याच्या प्रयत्नात कोसळले.
या अपघातात ५५ पैकी ५० प्रवाशांचा मृत्यू झाला. १७ जुलै २००० अलीन्स एअर विमान पटना विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करताना कोसळले. या अपघातात ६२ प्रवाशांपैकी ६० जणांचा मृत्यू झाला.
४ सप्टेंबर २००९ - एअर इंडिया एक्सप्रेस विमान मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, कर्नाटक येथे उतरायचा प्रयत्न करताना कोसळले. या अपघातात तासलेले १६६ प्रवाशांपैकी १५८ मृत्यू झाले.
७ ऑगस्ट २०२० एअर इंडिया एक्सप्रेस विमान केरळमधील करिपूर विमानतळ (कालीकट आंतरराष्ट्रीय विमानतळ) वर उतरायचा प्रयत्न करताना कोसळले. १६५ प्रवाशांपैकी २१ जण मृत्यूमुखी पडले.